संत साहित्य आणि समाज
संत साहित्य आणि समाज दिनांक १५ जुलै २०२२ रोजी 'कडेपठार बंगला' सायखिंडी फाटा प्रा. प्रवीण मेहेत्रे यांच्या निवास्थानी मैत्री सद्भावना ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीस डॉ अमित शिंदे, प्रवीण मेहेत्रे, शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, सीमा मालाणी, मीरा मेहेत्रे, वीणा मेहेत्रे, रेणुका मेहेत्रे, संदीप मेहेत्रे, अंतून घोडके आणि प्रा. सुशांत सातपुते उपस्थित होते. नुकतीच आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा होऊन गेलेली असल्याने त्या दिवशी संत साहित्यावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम सीमा मालाणी यांनी लोकसत्ता मधील स्त्री संतांविषयीच्या 'न व्हावे उदास' या लेखाचे वाचन केले. तेराव्या शतकात वारकरी संप्रदायात स्त्रियांनी बरोबरीचे स्थान मिळवून अभंगरचना करून अनेकदा क्रांतिकारी भूमिका घेतली होती. 'भेदाभेद भ्रम अमंगळ' हे ब्रीदवाक्य असलेल्या वारकरी संप्रदायात विविध जाती, धर्मातील स्त्री पुरुष संत होऊन गेले. 'स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास.' या ओळी अक्षरशः जगणाऱ्या अनेक स्त्री संतांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुरुष संतांच्या घरातील स्त्रिया वारकरी संप्रदायात ओढल्या गेल्या, त्या